लोहारा प्रतिनिधी -
ग्राम सामाजिक परिवर्तन संस्था (VSTF) अंतर्गत समाविष्ट लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे ग्रामीण रोजगार व स्वयं रोजगार संस्था उस्मानाबाद च्या वतीने उमेद स्वयं सह्ययता महिलांचे शेळीपालनाचे 10 दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. गट विकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्या मार्गदशनखाली आयोजित या कार्यक्रमास पंचयात समितीच्या उपसभापती हेमलता रणखांब, सरपंच वर्षाताई चव्हाण, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक निलेश विजयकर, RSETI चे संचालक मिलिंद चव्हाण, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश हे उपस्थित होते. यावेळी RSETI संचालक मिलिंद सावंत यांनी शेळीपालन व्यवसायाचा उद्देश व महत्त्व याबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. उमेद तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी अशा प्रशिक्षणातून उमेद महिलांनी गावस्तरावर कायमस्वरूपी उपजीविका निर्माण करून उत्पन्नात वाढ करावी व शाश्वत उपजीविकेसाठी गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून सामूहिक महिला व्यवसायाची निर्मिती करावी असे महिलांना आवाहन केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी आर्थिक साक्षरता, बँकिंग व्यवहार हे महिलांना माहित असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले व आधुनिक युगात कौशल्य पूर्ण व्यवसायाचा अंगीकार करावा असे मत व्यक्त केले. यावेळी ग्राम संघ सचिव शीतल रनखांब यांनी सर्व महिलांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माकणी बँक व्यवस्थापक, CAM, CLM, कृषी सखी, पशु सखी व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरवसे यांनी तर आभार किशोर हुडेकर यांनी मानले.


No comments:
Post a Comment