29 March 2020
झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका परत एकदा सुरू होणार - संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केली होती मागणी -
झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका परत एकदा सुरू होणार - संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केली होती मागणी -
पुणे प्रतिनिधी -
झी मराठी वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या मालिकेमुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास प्रेक्षकांसमोर आला होता. परंतु या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी घरी बसून राहावे व त्यांना परत एकदा छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट पाहता यावा यासाठी ही मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित करावी अशी इच्छा महाराष्ट्रातील अनेक बहुजन लोकांची होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड ने पुढाकार घेत झी मराठी, डॉ. अमोल कोल्हे यांना स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा प्रदर्शित करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केली होती. या मागणीप्रमाणे अखेर सोमवार (दि. ३०) पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागच्या वेळी कामाच्या वेळा मुळे अनेकांना ही मालिका पाहत आली नव्हती. या लोकांना ही मालिका पाहता येईल.
कोरोना विषाणूचा जगात व देशात भयंकर तांडव चालू आहे. यावर उपाय म्हणजे स्वतःची काळजी घेणे, संसर्ग होऊ नये यासाठी अनावश्यक वर्दळीच्या ठिकाणी न जाणे. देशात कलम १४४ लागू झाल्यानंतर तर कुणालाही घराच्या बाहेर पडता येत नाही. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी या मालिकेचा समाजालाही एक खूप मोठा फायदा होणार आहे. आणि विशेष म्हणजे लाखो कुटुंब सध्या ही मालिका एकत्र पाहू शकतील.
कोणत्याही आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जायचं याचा संदेश छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म त्यागातून समाजाला मिळणार आहे. त्यावरील बाबींचा विचार केल्यास आम्हाला असे वाटते कि देश आणि समाजासाठी परीक्षेचा काळ आहे. त्यामुळे या काळात समाजाला प्रेरणादायी मालिका दाखविणे गरजेचे आहे. मागणीनुसार ही मालिका पुनः प्रदर्शित करण्यात येत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने झी मराठी आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे आभार मानण्यात आले. येत्या ३० मार्चपासून ही मालिका पुन्हा सुरू होत आहे. ३० मार्च रोजी मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईल. दुपारी ४ वाजता ही मालिका प्रसारित होईल. त्यानंतर दररोज ४ ते ८ या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
कोरोनावर मात करण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून समाजाला प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही मालिका पाहावी असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


Thank u very much
ReplyDelete