28 November 2019

उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञानमंच परीक्षेत भारत विद्यालय उमरगा येथील चार विद्यार्थ्यांची निवड



प्रतिनिधी / उमरगा

उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञानमंच परीक्षेत जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात भारत विद्यालय उमरगा येथील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये सृष्टि, क्षीरसागर, वैष्णवी मुसांडे, माधुरी आगडे, आस्था जोळदापके यांचा समावेश आहे. तर प्रतिक्षा यादीत धनश्री नांगरे हिचा समावेश आहे. विज्ञानमंच परीक्षेत निवड झाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शाहूराज जाधव व पर्यवेक्षक विक्रांत मोरे, पर्यवेक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक मल्लिकार्जुन लोहार, रेणूका इंगळे, संदीप चव्हाण, व्यंकटेश पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सदरील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment