01 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट



राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट


उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयाच्या अनुषंगाने केली चर्चा


खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही घेतली भेट



उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तेरणा साखर कारखाना यासह काही प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी ( दि ३१) उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. प्रामुख्याने जिल्हयातील रेल्वे प्रश्नावर देखील चर्चा केली. तुळजाभवानी देवस्थान रेल्वे नकाशावर यावे याकरिता सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली असून २०१९च्या अर्थसंकल्पात १कोटी रुपयांची तरतूद केली होती परंतु सर्वेक्षणाच्या पुढे काहिच झालेले दिसत नाही. ही बाब साहेबांच्या निदर्शनास आणून दिली व आज संपूर्ण देशात कोराना साथीच्या रोगामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाचा जास्तीत जास्त भाग राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याची तयारी दर्शवली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागु शकतो. यापुर्वी राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गासाठी अशा स्वरूपाचे योगदान दिले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गावरील जास्तीत जास्त काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी मान्यता देण्यासाठी  राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वेसाठी जे सहकार्य केले त्या धर्तीवर प्रस्ताव सादर करण्यासाठी  राज्य सरकारला विनंतीपुर्वक सुचीत करावे अशी विनंती केली. तसेच तेरणा कारखान्याच्या बाबतीत देखील शेतकरी आणि कामगार आडचणीत असुन भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सामंजस्य दाखवल्यास तेरणा कारखाना पुढील हंगामात सुरु होऊ शकतो. ज्यामुळे शेतकरी, कामगार आणि जिल्हा बँकेला खुप मदत होऊ शकेल अशी चर्चा केली चर्चेअंती पवार साहेबांनी यामध्ये न्यायालयीन अडचण येणार नसेल तर नक्की तोडगा काढता येईल असे आश्वासन दिले. रेल्वे प्रश्नाबाबत राज्य सरकारला किती आणि कशा स्वरुपात सहभाग नोंदवता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकहिताचे प्रलंबित प्रश्न पवार साहेबांच्या पुढाकारातून मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. या चर्चेवेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या समवेत अॅड प्रविण यादव उपस्थित होते.



             तेरणा कारखाना विषयावर सुप्रिया ताई सुळे यांच्यासोबत देखील चर्चा झाली. यावेळी निवेदन ही देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर,  अॅड प्रविण यादव, प्रशांत कवडे, सचिन तावडे, शंतनू खंदारे, तौफीक पटेल हे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment