07 September 2020

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या ऊस पिकाची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली पाहणी



प्रतिनिधी / उमरगा

 उमरगा तालुक्यातील येणेगुर व बलसुर परिसरात रविवारी ( दि. ६) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे ऊस पिकाचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. सोमवारी ( दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी या नुकसानीची पाहणी केली.
       उमरगा तालुक्यातील येणेगुर व बलसुर परिसरात रविवारी (दि.६) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने ऊस पिकाचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उंच वाढलेल्या ऊस पिकासाठी अनेक ठिकाणी हा पाऊस हानिकारक ठरला आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली. यावेळी येणेगुर येथील शेतकरी काशिनाथ व्हनाळे, विठ्ठल व्हनाळे, राजू माळी, उमेश पाटील, छानूमिया जवळगे, गुंडाप्पा व्हनाळे, उमेश दामशेट्टी आदींसह भीमा स्वामी, आयुब जवळगे, वैभव बिराजदार, नेताजी कवठे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment