06 December 2019







प्रतिनिधी / उमरगा

उमरगा तालुक्यातील व्हतांळ येथे व्हंताळ ते बेटजवळगा गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुरेश बिराजदार यांच्या हस्ते शुक्रवारी ( दि. ६) करण्यात आले.
                व्हंताळ ते बेटजवळगा गावाला जोडणारा, शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी महत्वाचा असलेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जि. प . निधी गट अ अंतर्गत  डांबरी रस्त्याच्या १२ लक्ष रुपयाच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त बाबसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्हंताळचे उपसरपंच राजाभाऊ पाटील, संदीपान पाटील, सोसायटीचे चेअरमन प्रताप मोहिते, जयचंद्र जाधव, राजाभाऊ जगताप, हरिश्चंद्र पवार यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा जर आपल्या प्रगतीला बाधक ठरत असतील तर त्याला थाराच का द्यायचा ? तरुण वर्गाने आवर्जून सामाजिक कार्यात सहभागी होऊन हुंडा प्रथा, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या अश्या समाजविघातक अनिष्ठ प्रथा समूळ नष्ठ करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. मुलींना शिक्षणाचे महत्त्व सांगून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे असे मत जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांनी जि प सदस्य सुरेश बिराजदार यांच्या आतापर्यंतच्या कामाबाबत कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. याच कार्यक्रमात एनटीव्ही चे प्रतिनीधी सचिन बिद्री, दै. संघर्ष चे पत्रकार अमोल पाटील यांनी समाजप्रबोधनपर बनवलेल्या "बालविवाह एक अभिशाप" या समाज प्रबोधनपर लघुचित्रपटात योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपान पाटील यांनी तर प्रताप मोहिते यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment