08 December 2019

बार्टीच्या वतीने संविधान साक्षर ग्राम वडगांव(गां) येथे रक्तदान शिबिर संपन्न






प्रतिनिधी / लोहारा

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) पुणेचे महासंचालक  कैलास कणसे (भा.प्र.से.) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत किरण चिंचोले, नागनाथ फुलसुंदर यांनी संविधान साक्षर ग्राम वडगाव(गां) मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. समतादूत किरण चिंचोले यांनी बार्टीच्या योजना सांगितल्या. संविधान साक्षर ग्रामचे महत्व पटवून दिले. प्रमुख म्हणून लाभलेले डॉ गणेश साळुंके यांनी रक्तदान याविषयी सविस्तर माहिती दिली. हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला. या शिबिरास डॉ. अश्विनी गोरे, डॉ. गणेश साळुंके, डॉ. मेघशाम भोजने, डॉ. अक्कानवल, समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले यासह गावातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीरामध्ये समतादूतांसह 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये अमोल साळुंके, लहू गायकवाड, रफिक सय्यद, गणेश गोरे, भीमाशंकर बेळे, सुभाष आतकरे, हरी साळुंके, सुभाष भुजबळ, जितेंद्र गायकवाड, शिवाजी चव्हाण, आयाज सय्यद, बालाजी साळुंके यासह अनेकांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी तर आभार डॉ अश्विनी गोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश गोरे, सुभाष आतकरे, प्रमोद माळी, रफिक सय्यद यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment