प्रतिनिधी / उमरगा
तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना व क्वीनर्जी इंडस्ट्रीजच्या सन २०१९-२० चा गाळप हंगामाचा शुभारंभ २५ नोव्हेंबरला करण्यात आला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याची हमी चेअरमन सुरेश बिराजदार यांनी दिली होती. अखेर गुरुवारी (दि. ५) दोन हजार ४५१ रुपये भाव देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू करण्यात आला असून कारखाना चालू करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याने संचालक मंडळाने पुणे येथील क्वीनर्जी इंडस्ट्रीज लि या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अनुभवी कंपनीला कारखाना भाडेतत्वावर दिला असून याचा फायदा ऊस उत्पादकांना होत आहे. येणाऱ्या काळात अन्य उपपदार्थ निर्मीती करण्याचा मानस आहे. तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांची ससेहोलपट थांबनार आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ऊसाला चांगला भाव मिळण्याची खात्री असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना सांगितले होते. अखेर गुरुवारी यंदाच्या वर्षी एफआरपी प्रमाणे दोन हजार चारशे ५१ रुपये भाव देण्यात येणार असल्याचे बिराजदार यांनी जाहीर केले असुन शेतकरी अन सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन सुरेश बिराजदार यांनी केले आहे. पुणे येथील क्वीनर्जी इंडस्ट्रीजचे संचालक सचिन सिनगारे यांनी संचालक, शेतकरी व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ऊसाचा यंदाचा दर जाहीर करून ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसात जमा करणार असुन यावर्षी ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील वर्षी प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
No comments:
Post a Comment