30 May 2020

लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान




प्रतिनिधी / लोहारा

सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील युवकांनी गुरुवारी ( दि. २८) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एक्कावन्न नागरिकांनी रक्तदान केले.
              जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव मंदिरात या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत साखरे, जिल्हा रूग्णालय रक्त संकलन कक्षातील गणेश साळुंखे, किशोर म्हेत्रे, दिनकर सुपेकर, स्पर्श रूग्णालयातील लँब टेक्निशियन जगदीश कुलकर्णी, फार्मासिस्ट उज्ज्वल कारभारी, महादेव कारभारी उपस्थित होते. यावेळी बोलताना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी कोरोनाबाबत काय काळजी घ्यायला हवी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.एम.बिरादार, हभप कमलाकर कोळी, हभप हणमंतप्पा भुसाप्पा, अशोक साखरे, काशिनाथ घोडके, वीरभद्र स्वामी उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी महादेव कारभारी, काशिनाथ लकडे, प्रविण बोदाडे, महादेव भुसाप्पा, गुणवंत तांबडे, संदेश होनाजे, वैजीनाथ होनाजे, राहूल होनाजे, तानाजी शिवरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सुधीर येणेगुरे यांनी आभार मानले.



युवतींनीही केले रक्तदान

या शिबिरात शिवानी ज्ञानेश्वर कारभारी व सुप्रिया बाबुराव भुसणे या अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवतीनी पहिल्यांदाच रक्तदान केले. त्यांच्यामुळे रक्तदान करण्यासाठी महिलांना स्फूर्ती मिळाली आहे.

No comments:

Post a Comment