03 July 2020

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक - उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले


प्रतिनिधी / लोहारा

कोरोना १९ विषाणू प्रतिबंधाबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत.  त्यामध्ये नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी एका प्रेसनोट द्वारे केले आहे.
                       यामध्ये म्हणले आहे की, कोरोना १९ विषाणूंचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने सर्व नागरीकांना तसेच दुर्धर आजारग्रस्त व्यक्तीं ज्यामध्ये कर्करोग, एचआयव्ही एड्स, मधुमेह, हायपर टेन्शन, अस्थमा, ह्यदयविकार इ. व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. सदर व्यक्तींनी अत्यावश्यक गरजेसाठीच घराबाहेर पडावे. तसेच कोरोना बाधीत क्षेत्रातून आलेल्या नागरीकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी. नागरींकामध्ये कोरोनाची लक्षणे उदा. ताप, सर्दी, श्वसनास त्रास, खोकला, अशक्तपणा इ. दिसून येत असल्यास त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून आपली तपासणी करुन घ्यावी. तसेच बाहेर फिरताना तोंडाला मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.  तथापि वरिल बाबींचे उल्लंघन केल्यास संबधित नागरीकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई करणेत येईल. याबाब नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment