31 July 2020
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांना पाठविली १५०० पत्रे
प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांना शुक्रवारी (दि. ३१) जय भवानी, जय शिवाजी मजकूर लिहिलेली १५०० पत्रे पाठवण्यात आली आहेत.
राज्यसभा सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यावेळी राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी इथे अशा घोषणा देता येणार नाहीत असे सांगितले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. परंतु त्याच भारत देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शपथविधी दरम्यान जो काही प्रसंग उद्भवला त्याचा आम्ही निषेध करत आहोत असे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच मोदी सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊनच सत्तेत आले आहे. परंतु त्यांना याचा विसर पडला आहे असे दिसत आहे. त्यामुळे याची आठवण करून देण्यासाठी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवराय असा मजकूर लिहून १५०० पत्र पाठवण्यात आली. लोहारा शहरातील डाक कार्यालयातून ही पत्रे पाठविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक गगन माळवदकर, सुनील साळुंके, माधव पाटील, पृथ्वीराज जगताप, निहाल मुजावर, हेमंत माळवदकर, नवाज सय्यद, महेबूब फकीर, संजय जाधव, सचिन रणखांब, राहुल जाधव, दादा पाटील, शैलेश चंदनशिवे आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment