30 July 2020

घरगुती व शेतीचे संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी



प्रतिनिधी / लोहारा

घरगुती व शेतीचे संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार विजय अवधाने यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
                   या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे तालुक्यासह संपूर्ण देशाचे अर्थचक्र थांबले आहे. लोकांच्या हाताला काम नाही, जनता प्रचंड अडचणीत सापडली आहे. कोरोनाच्या या महाभयंकर संकटामुळे मागील चार महीने सर्व नागरिक घरात बसून आहेत. अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. अशातच विज वितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले पाठऊन नागरिकांची एक प्रकारची लुबाडणूक सुरु केल्याचे दिसून येत आहे. नागरिक आधीच चिंताग्रस्त असताना हे नवीन आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी शेती व घरगुती विजबिल माफ करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुका उपाध्यक्ष दादासाहेब रवळे, सतीश बनसोडे, संदीप मोरे, नागेश संदिकर, बालाजी साळुंके यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment